healthplanet.net

Posted on

पोटातील अन्न पचण्यास किती वेळ लागतो ? तुम्हाला माहीत आहे का ?

चला, जरा सत्य परिस्थितीवर नजर टाकूयात – एका प्रश्नाचे उत्तर द्या ? तुम्ही तुमच्या पचनसंस्थेबद्दल कधी विचार केला आहे का ? ही पचनसंस्था आपल्या शरिरासाठी रात्रंदिवस कसे कार्य करते हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का ? आपण दिवसभर अरबट-चरबट किंवा जंक फूड खात राहतो. जे काही खायला मिळते ते सर्व आपण पोटात घालत राहतो. अगदी एखाद्या रिकाम्या कचराकुंडीप्रमाणे आपण पोटात मिळेल ते घालत राहतो. अशी आपली बेफिकीर वृत्ती असूनही आपली पचनसंस्था आपली किती काळजी घेते हे कधी आपल्या ध्यानात आले आहे का ? यासाठी आपण कधी पचनसंस्थेचे कौतुक केले का ? नाही ना ?
आपल्या सवयी कशा असतात हे माहीत आहे का ? एकदा अन्न तोंडात गेले नाही, की आपण सगळे विसरतो. ते आपल्या मनातून देखील निघून जाते. फक्त खाल्ले आणि पचले हेच लक्षात राहते. जोपर्यंत आपल्याला कोणतीही समस्या निर्माण होत नाही तोपर्यंत आपण हेच करत असतो. तथापी, या वृत्तीसाठी मी तुम्हाला दोष देणार नाही. जेवताणा आपण अशा वैज्ञानिक-पुस्तकीय गोष्टी कशा लक्षात ठेवणार ? किंवा काय खाल्ले पाहिजे काही नाही हे आपण मनातून कसे ठरवणार ? परंतु, काही हरकत नाही, आज याविषयी आपण थोडी चर्चा करूया.

काय तुम्हाला माहीत आहे का ? की आपण जेवण केल्यानंतर आपण खाल्लेल्या जेवणाचे काय होते ? चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपली पचनसंस्था अनेक जटिल, परंतु महत्त्वपूर्ण आणि क्रियाशील विभागांमध्ये विभागण्यात आलेली आहे. हे सर्व तुम्ही शाळेत असताना विज्ञानाच्या पुस्तकात वाचले आहे का ? मात्र, जर तुम्ही विसरला असाल तर, आपली पचनसंस्था कशी कार्य करते ? आपले अन्न पचायला साधारणपणे किती वेळ लागतो ? तसेच, या विषयाबद्दल आपल्याला आणखी काय माहित असणे आवश्यक आहे ते आपण विस्ताराने जाणून घेऊयात.



पचनक्रियेच्या दरम्यान नेमके काय होते ? (What happens during digestion? )


अन्न पचवण्याची पहिली पायरी म्हणजे अन्नाचे योग्य प्रकारे सेवन करणे होय.
त्यानंतरची दुसरी पायरी 

अन्न चांगल्या प्रकारे चावून खाणे. नुसते अन्न चघळल्याने अन्न पचत नाही. त्याउलट, अन्न चावून खाताना आपल्या तोंडाच्या आतील लाळ ग्रंथी, अन्नामध्ये मिसळून ते ओलसर करण्याचे काम करतात. त्यामुळे, अन्न पचन होण्यास मदत होते. त्यानंतर हे अन्न पचण्यालायक होते.

जरा विचार करा की, कोरडे अन्न गिळले जाऊ शकते का ? माझ्याकडून तर तेलाशिवाय चपाती खाल्ली देखील जात नाही. जर तेल नसेल चपातीला तर ती चपाती गळ्याखाली कशी काय उतरेल ? हा झाला विनोदाचा भाग. परंतु, आपली लाळ, तोंडाच्या आतील भागात ही लाळेच्या रूपात असते. आपण अन्न चावून खाताना ती अन्नात मिसळते आणि जेवण मऊ बनवते. जेणेकरून अन्न आपल्या अन्ननलिकेतून सहज जाऊ शकते, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीज यांचे म्हणणे आहे.

अन्न गिळल्यानंतर, ते अन्न घशातून गेल्यावर, अन्ननलिकेच्या खालच्या भागात म्हणजेच अन्ननलिकेच्या स्फिंक्टरपर्यंत (Esophageal sphincter) पोहोचते. जो एक स्नायू आहे, जो अन्नाला हळूहळू पोटात जाऊ देतो किंवा परवानगी देतो. त्यानंतर, आपल्या पोटातील स्नायू हे अन्नाला पाचक रसांमध्ये मिसळतात. त्यानंतर, पोटाच्या अस्तरात असलेल्या ग्रंथी पोटात एन्झाईम्स आणि आम्ल तयार करतात. जे अन्न अधिक बारीक बनवण्यास मदत करतात.

अन्न हे आपल्या लहान आणि मोठ्या आतड्यांमधून पुढे जाते. लहान आतड्यात, पचलेली पोषकतत्वे आणि पाणी हे रक्तप्रवाहात शोषले जाते. तसेच, मोठ्या आतड्यातील गेल्यावर अन्नातील द्रव कचरा हा 'विष्ठेमध्ये' बदलते. जे गुदाशयात जाते. त्यानंतर ते शौचाद्वारे बाहेर टाकले जाते.
संपूर्ण पचन प्रक्रियेस साधारणपणे किती वेळ लागतो ?

अन्नाचे सेवन करणे आणि ते पचवण्यापर्यंतच्या दरम्यान लागणारा वेळ याला पचनक्रिया असे म्हणतात. ही पचनक्रिया अनेक घटकांवर अवलंबून असते. कारण, प्रत्येक व्यक्तीची पचनसंस्था ही इतरांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे यासाठी लागणारा कालावधीही बदलतो. दुसरे म्हणजे, हे अनेक घटकांवर अवलंबून असते. कोणत्याही व्यक्तीचे अन्न पचायला 2 ते 5 दिवस लागतात. गॅस्ट्रोएंन्ट्रोलॉजिस्ट सांगतात की, ही पचनाची वेळ व्यक्तीपरत्वे बदलते.

ते पुढे म्हणतात की, ‘पचनक्रियेच्या वेळेत फरक पडण्याची अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये पहिले आणि मुख्य कारण म्हणजे, तुम्ही कोणते अन्न खात आहात ? त्याचवेळी, प्रक्रिया केलेले अन्न आणि थंड पदार्थ हे पचनक्रियेला मंद करतात.

साधा आहार घेतला तर तो पचायला सोपा असतो. साधा आहार म्हणजे मसूर भात, भाजी रोटी किंवा ओट्स होय. खरं तर ओट्स खाल्ल्यानंतर दोन-तीन तासांत पुन्हा भूक लागायला लागते. या उलट पिझ्झा, सॉसेज किंवा मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी आपली दीर्घकाळ भूक मारतात. याचे कारण असे की, प्रक्रिया केलेल्या अन्नातील मिश्रित रसायने ही वेगळी करणे आणि ते लवकर पचवणे शरीरासाठी किंवा आपल्या पचनसंस्थेसाठी सोपे नसते. त्यामुळे ते पचायला शरिराला जास्त वेळ लागतो.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info