healthplanet.net

Posted on

प्रेग्नेंट महिलांनी पाणी पिताना घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा बाळाच्या जीवाला पोहचू शकतो धोका!

कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यास अगणित लाभ होतात पण हेच कोमट पाणी प्रेग्नेंसीमध्ये पिणे कितपत सुरक्षित आहे? गर्भावस्थेत कोमट पाणी प्यायल्याने गर्भातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो का? लेख वाचा व काळजी घ्या.
 
गरोदरपणात स्त्री जे काही खाते पिते त्याचा थेट परिणाम पोटातील बाळावर देखील होतो. यासाठीच स्त्रीने गरोदरपणात शक्य तितकी काळजी घेतली पाहिजे. गरोदर स्त्रीच्या खाण्यापिण्याचा विषय निघताच गरम पाणी स्त्रीने गरोदरपणाच्या काळात प्यावे किंवा नाही याबद्दल आजही मतमतांतरे दिसून येतात. काही जण म्हणतात की गरोदर स्त्रीने गरम पाणी पिऊ नये ज्याचा त्रास गर्भातील बाळाला होऊ शकतो,

तर काहीच्या मानते शरीराच्या सुदृढतेसाठी आणि सुरक्षेसाठी गरम पाणी पिणे लाभदायक ठरते आणि म्हणून गरोदर स्त्रीने गरम पाणी पिणे यात काही गैर नाही. आज आपण याच वादामागचा मागचा मागोवा घेऊन गरोदर स्त्रीने गरम पाणी पिणे खरंच घातक आहे की लाभदायक ते पाहुया आणि या गरम पाण्याचा गर्भातील बाळावर काय परिणाम होतो ते सुद्धा जाणून घेऊया.
गरम पाणी पिण्याचे फायदे
गरम पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते ज्यामुळे मोर्निंग सिकनेस, छातीत जळजळ यांसारख्या समस्यांचा प्रभाव कमी होतो. एकप्रकारे या समस्या गरम पाणी प्याल्याने दूर होतात. गरम पाणी प्यायल्याने पोट साफ राहते आणि पचन सुद्धा चांगल्या प्रकारे होते. यामुळे गरोदरपणात होणारी बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. गरम पाणी शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करते. रोज एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने स्टॅमिना वाढतो आणि शरीरातील उर्जा देखील वाढते. यामुळे गरोदरपणात जाणवणारा थकवा सुद्धा कमी होतो.

या गोष्टींची घ्या काळजी
गरोदरपणात गरम पाणी अवश्य प्यावे पण ते जास्त गरम असू नये. ते कोमटच असावे. नळातून थेट येणाऱ्या गरम पाण्यामध्ये लीड आणि मोठ्या प्रमाणात मिनरल असू शकतात जे आई आणि बाळ दोघांना नुकसान पोहचवू शकतात. लीड आणि मिनरलमुळे बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर प्रभाव पडू शकतो. यामुळे बाळाचे फुफ्फुस, मेंदू, लिव्हर, नर्व्हस सिस्टम, किडनी आणि लाल रक्त पेशींना नुकसान पोहचू शकते. पाणी नेहमी फिल्टर केलेले आणि उकळून थंड केलेलेच प्यावे कारण यामुळे पाण्यातील लीड आणि शरीराला घटक ठरतील असे मिनरल्स नष्ट होतात.

शरीराला का असते पाण्याची गरज?
गरोदरपणात शरीरामध्ये डिहायड्रेशन आणि थकवा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास मळमळ, चक्कर येणे, सूज तयार होणे यांसारख्या अधिक समस्या सुद्धा सतावू शकतात. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये खास करून शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळणे गरजेचे आहे. या काळात पपाण्याची कमतरता निर्माण झाल्यास कॉन्ट्रेक्शन उठू शकते आणि मुदतपूर्व प्रसूती सुरु होऊ शकते. म्हणूनच गरोदर स्त्रीने जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. र्रोज पुरेसे पाणी प्यायल्यास मुत्र मार्गात संक्रमण होत नाही आणि मूत्राशय साफ राहते.

डिहायड्रेशनचा धोका
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे यालाच वैद्यकीय भाषेत डिहायड्रेशन असे म्हणतात. पाणी आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक होय. आपण एकवेळ अन्न न खाताना जास्त दिवस जगू शकतो, पण पाण्याशिवाय फारच कमी दिवसात आपला अंत होईल, म्हणून म्हणतात ना पाणी हे मनुष्यासाठी जीवन आहे. आपलं शरीर हे जवळपास ७० टक्के पाण्याने तयार झालेलं आहे. आपण हे केवळ आपल्याला जिवंत ठेवत नाही तर आपल्या शरीराला क्रियाशील राखण्यासही मदत करते. डिहाइड्रेशन झालं की शरीरात खूप समस्या सुरु होतात. आणि जर वेळीच पाणी मिळालं नाही तर मात्र जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच गरोदर स्त्रीने सतत पाणी प्यावे.

पाण्याची कमतरता निर्माण झाल्याची लक्षणे
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याचे कसे ओळखावे हे आपण आता जाणून घेऊ. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास गरोदर स्त्रीला खूप थकवा जाणवतो. आपल्या अंगात ताकद नसल्याची जाणीव त्याला होते. हे यामुळे कारण शरीराला उत्स्फूर्त ठेवणाऱ्या पाण्याचा स्तर कमी झालेला असतो. थोडीशी मेहनत केल्यावरही गरोदर स्त्रीला लगेच थकवा जाणवतो. याव्यतिरिक्त पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा शरीरात कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते. ज्याचा परिणाम शरीरावर होऊन डोकं दुखू लागतं, चक्कर येते. हि सगळी लक्षणे दिसू लागल्यावर वेळीच पाणी प्यावे, जेणेकरून शरीर पूर्ववत होईल.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info