Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
खोकल्याची उबळ थांबेना
कडक उन्हामुळे आणि घामांच्या धारांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना येणाऱ्या व्हायरल तापात वाढ झाली आहे. आता त्यात कोरड्या खोकल्याची भर पडली आहे. विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी पोषक ठरलेल्या या वातावरणामध्ये कोरडा खोकला, घसा खवखवणे, घसादुखी यांसारख्या त्रासामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
कडक उन्हामुळे आणि घामांच्या धारांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना येणाऱ्या व्हायरल तापात वाढ झाली आहे. आता त्यात कोरड्या खोकल्याची भर पडली आहे. विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी पोषक ठरलेल्या या वातावरणामध्ये कोरडा खोकला, घसा खवखवणे, घसादुखी यांसारख्या त्रासामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये खोकला थांबत नसल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्णांना कोरडा खोकला येत असून हा खोकला थांबत नाही, किंवा काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्यानंतर खोकल्याचा त्रास वाढत असल्याचे दिसून येत आहे सार्वजनिक रुग्णालयामध्ये रोज अशा तक्रारी घेऊन सुमारे ४० ते ५० रुग्ण येतात.
उष्मा असह्य झाला की मुंबईकर रस्त्यावरचे थंड पदार्थ, बर्फाचे गोळे वा फ्रीजमधील गारेगार पाणी यांचा भडीमार सुरू करतात. त्यामुळे खोकला बळावतो, घसादुखीचा त्रास सुरू होतो. तापाचा जोर उतरला तरीही खोकला कमी होत नाही, असे फिजिशिअन डॉ. पराग मेस्त्री यांनी सांगितले.
वातावरणातील बदलांमुळे खासगी रुग्णालयांमध्ये खोकल्याच्या तक्रारींचे प्रमाण अचानक वाढले आहे. काहीजणांना खोकल्यामुळे धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे असा त्रास सातत्याने होत राहतो. झोपही लागत नाही. ताप आल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याचा कल असतो, मात्र खोकला असह्य होईपर्यंत डॉक्टरांचे उपचार घेतले जात नाही. खासगी व सार्वजनिक रुग्णालयांतील अशा ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये घशातील विविध प्रकारचा संसर्ग वाढलेला दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
रक्ततपासणी महत्त्वाची
ज्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरिया याची शक्यता असलेले रुग्ण येतात त्यांना रक्त तपासण्या किंवा अन्य काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातून नेमका काय आजार आहे याचे निदान होणे शक्य होते. खोकल्यासाठी केवळ लक्षणांवरून निदान करून औषधे दिली जातात. त्यासाठीही योग्यवेळी रक्तचाचणी करून संसर्गाचे प्रमाण किती आहे, याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. काही वेळा रक्तामधील संसर्गाचे प्रमाण वाढले की त्यामुळेही खोकल्याचा त्रास वाढतो, सतत खोकल्याची उबळ आल्याने मूत्रमार्गावरील ताबाही सुटतो त्यामुळेही मूत्रमार्गाचा संसर्ग निर्माण होण्याच्या वेगळ्या तक्रारीही भेडसावतात.
| --------------------------- | --------------------------- |