healthplanet.net

Posted on

सावधान, किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ 5 भयंकर संकेत, वेळीच ओळखा नाहीतर…!
Kidney kharab honyachi lakshane : दुखापत, उच्च रक्तदाब (high blood pressure), मधुमेह (diabetes) यांसारख्या समस्यांमुळे जेव्हा किडनी खराब होते तेव्हा ती शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ (toxins) जमा होतात. किडनी निकामी होण्याची लक्षणे इतकी किरकोळ आहेत की ती दिसतही नाहीत आणि कधी कधी जाणवतही नाहीत. आज आम्ही येथे काही अशी लक्षणं तुम्हाला सांगणार आहोत, जी तुम्हाला किडनी निकामी होण्यापूर्वी दिसतात.
किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत करते. हे सर्व विषारी पदार्थ आपल्या मूत्राशयात जातात आणि लघवी करताना बाहेर पडतात. लाखो लोक विविध प्रकारच्या किडनीच्या आजारांनी ग्रस्त असतात आणि त्यापैकी बहुतेकांना याची माहितीही नसते. याच कारणामुळे किडनीच्या आजाराला अनेकदा सायलेंट किलर म्हणून संबोधले जाते. किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. दुखापतीमुळे, उच्च रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे मूत्रपिंड खराब झाल्यास ते शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात विष तयार होते. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नाही आणि विषारी पदार्थ जमा होत जातात. इथे आज आम्ही तुम्हाला टॉक्सिक किडनीची काही लक्षणं सांगणार आहोत, जी तुम्हाला वेळेवर सांगतील की तुमची किडनी खराब होऊ लागली आहे आणि तुम्ही त्याकडे लवकर लक्ष दिले पाहिजे.
भूक कमी होणं

शरीरात विषारी घटक आणि कचरा जमा झाल्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होते. भूक कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे सकाळी सकाळी होणारी मळमळ आणि उलट्या हे देखील आहे. यामुळे माणसाला सतत पोट भरलेले वाटते आणि काहीही खाण्याची इच्छाच होत नाही. हे किडनी निकामी होण्याचं खतरनाक लक्षण आहे, ज्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
घोटा आणि पायात सूज

किडनी शरीरातील कचरा आणि अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात. जेव्हा किडनी योग्यरित्या काम करणे थांबवते तेव्हा शरीरात सोडियम जमा होते, ज्यामुळे पोट-या आणि घोट्याला सूज येते. या स्थितीला एडेमा म्हणतात. तसं तर किडनीत टॉक्सिक जमा झाल्यास डोळे आणि चेहऱ्यावर सूज दिसून येते पण त्याची सर्वाधिक लक्षणे ही हात, पाय आणि घोट्यांवर परिणाम करतात.
त्वचेमध्ये कोरडेपणा व खाज येणं

त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणे हे देखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे. जेव्हा किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास सक्षम नसते तेव्हा असे होते. मग हे विषारी पदार्थ रक्तात जमा होऊ लागतात, ज्यामुळे त्वचेला खाज सुटते, कोरडेपणा येतो आणि दुर्गंधी देखील येते.
कमजोरी आणि थकवा येणं

सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे ही किडनीच्या समस्येची सुरुवातीची लक्षणे आहेत. किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखी दिसू लागते. चालतानाही थोडा त्रास जाणवतो. हे किडनीत विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे होते.
सतत लघवीला होणे

एक सामान्य हेल्दी व्यक्ती दिवसातून 6 ते 10 वेळा लघवीला जाते. वारंवार लघवी होणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. किडनीच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला एकतर खूप वेळा किंवा खूप कमी वेळा लघवीला जाण्याची इच्छा होते. या दोन्ही स्थितीत किडनीला नुकसान पोहोचते. काही लोकांच्या लघवीत रक्तही येते. असं खराब झालेल्या किडनीमुळे रक्त पेशींची लघवीतून गळती झाल्यामुळे होते. प्राथमिक अवस्थेत उपाययोजना करून किडनीला होणारे नुकसान टाळता येते. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची पातळी असलेल्या लोकांना किडनी लवकर खराब होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे या लोकांनी आपल्या आरोग्याकडे चोख लक्ष ठेवावे. वैद्यकीय चाचण्या करून सुरुवातीच्या टप्प्यातच समस्यांचे निदान करणे आणि उपचार सुरू करणे सोपे होते म्हणून वेळोवेळी आपली मेडिकल टेस्ट करत राहा आणि सुरक्षित राहा.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info