Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
आपल्या शरीरामधील विविध अवयव हे वेगवेगळं कार्य करतात. एखाद्या अवयवावर काही परिणाम झाला तर त्याचे रुपांतर अनेक आजारांमध्ये होते. असंच काहीसं ब्लड शुगरच्या बाबतीतही घडतं. ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखचं आहे. रक्तातील सारखरेचं प्रमाण वाढण्यामागे बरीच कारणं आहेत. मात्र यामागील मोठं कारण म्हणजे आपला आहार. जेव्हा कार्ब्सचे अधिक प्रमाणात आपण सेवन करतो तेव्हा याची पचनक्रिया सुरु असताना साखरेमध्ये याचे रुपांतर होते.
शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढले की पेशींमध्ये ही साखर चिकटून राहते. यामुळे टाइप-२चा मधुमेह होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाणात नियंत्रणात आणायचं असेल तर डाएट करणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबरीने हृदय रोग, तणाव, धूम्रपान, जीवनशैलीमधील बदल यांमुळे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
या लोकांनी रक्तातील साखरेच्या प्रमाणाकडे लक्ष द्या
टाइप १ आणि टाइप २च्या मधुमेहामुळे तुम्ही त्रस्त असाल तर रक्तामधील साखरेच्या प्रमाणाकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तुमच्या रक्तामधील साखरेचं प्रमाण तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही त्यानुसार उपचार, डाएट करू शकता. तसचे व्यायामामध्येही काही बदल करू शकता. रक्तामधील साखरेचं प्रमाण अचानक वाढत असेल तर वेळीच सावध व्हा. वेळीच योग्य ती काळजी घेतल्यामुळे तुम्ही स्ट्रोक, किडनीचे आजार, हृदयविकार यांसारख्या आजारांपासून दूर राहू शकता.
ब्लड शुगरकडे करू नका दुर्लक्ष
मधुमेहामुळे त्रस्त असलेल्या लोकांनीच नव्हे तर इतर लोकांनी देखील रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. खाली नमुद केलेल्या लोकांनी रक्तातील साखरेच्या प्रमाणाकडे वेळीच लक्ष देणं फायदेशी ठरू शकतं.
- इन्सुलिन घेणारे लोक
- गर्भवती महिला
- अशाप्रकारची लोकं ज्यांना रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करणं अवघड वाटतं
- ज्यांची रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी असते
- अशी लोकं ज्यांच्या रक्तातील ग्लुकोज अचानक वाढतं
जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कधी तपासावं?
जेवणानंतर तुम्ही २ तासांनी रक्तातीतल साखरेचं प्रमाण तपासू शकता. यामुळे तुम्हाला अंदाज येईल की, आहारामध्ये तुम्ही कोणता खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे रक्तामधील साखरेचं प्रमाण वाढत आहे. तसेच डाएटमध्ये बदल करावा की नाही, कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन आपण केले पाहिजे याचा अंदाज देखील तुम्हाला येईल. रक्तातील साखरेच्या प्रमाणानुसार तुम्ही तुमचं डाएट बदलू शकता. मात्र त्यापूर्वीच तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा आवश्य सल्ला घ्या. डाएटमुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात येऊ शकते.
जेवणानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण किती असावं?
- गर्भवती महिला आणि ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण ९०-१८० mg/dL
- गर्भवती नाही मात्र त्यांना मधुमेहाचा त्रास त्यांच्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण १८० mg/dL
- मधुमेहामुळे त्रस्त आहेत आणि इन्सुलिनचा वापर करत आहेत त्यांच्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण १८० mg/dL
- मधुमेहामुळे त्रस्त आहेत मात्र इन्सुलिनचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण १४० mg/dL
- गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहामुळे त्रस्त असणाऱ्या महिलांसाठी रक्तातील साखरेचं प्रमाण १२० mg/dL
- ज्या गर्भवती महिला टाइप १ आणि २ प्रकारच्या मधुमेहामुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण १००-१२० mg/dL
रक्तातील साखरेचं प्रमाण तपासण्याची योग्य पद्धत
रक्तातील साखरेचं प्रमाण आणि त्याची तपासणी करणं तुमच्या शरीरासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही दोन प्रकारे साखरेचं प्रमाण तपासू शकता. ग्लुकोमीटर तसेच ग्लुकोज मॉनिटरींगद्वारे तुम्ही ही तपासणी करू शकता. त्याचबरोबरीने आठववड्यातून बऱ्याच वेळा तुम्ही रक्तातील साखरेची तपासणी करू शकता. तसेच गरज असेल तर तुम्ही दिवसातून चार ते सहा वेळा ब्लड शुगर तपासा. यामुळे तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि त्यामध्ये वारंवार होणारे बदल दिसून येतील.
रक्तातील साखरेची सामान्य पातळी
अमेरिकन डायबिटीज संस्थेच्या म्हणण्यानुसार, जेवणानंतर एक ते दोन तासांनी रक्तातील साखरेची पातळी १८० mg/dL असेल तर ती सामान्य मानली जाते. पण रक्तातील साखरेची ही पातळी सगळ्यांसाठी लागू होतेच असे नाही. हृदय रोग, मधुमेह होऊन किती काळ झाला, इतर कोणते आजार तर नाहीत ना यावर प्रत्येकाच्या रक्तातील साखरेचं प्रमाण किती असलं पाहिजे हे ठरतं. मात्र प्रत्येकाने याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. वेळीच योग्य ती खबरदारी न घेतल्यास अनेक आजारांना तुम्ही बळी पडू शकता.
डाएटमुळे रक्तातील साखर नियंत्रणात आणता येते का?
योग्य आणि हेल्दी आहारामुळे शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. त्यामुळे तुमच्या नियमित आहारामध्ये शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठा करणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे.
- कार्ब्स
- प्रोटीन
- फॅट
- व्हिटॅमिन आणि मिनरल्स
या पोषक घटकांमुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. तसेच या पोषक तत्त्वांचा ज्या खाद्यपदार्थांमध्ये समावेश असतो अशा खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेवर देखील नियंत्रण तुम्ही मिळवू शकता. मात्र डाएट सुरु करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
नियमित आहाराकडे लक्ष द्या
पोषक घटक आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र कार्ब्समध्ये बरेच प्रकार असतात ज्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही कार्ब्सचे सेवन करता तेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. खाली नुमद केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्त्तातील साखरेवर याचा परिणाम जाणवू लागतो.
१. स्टार्च किंवा कॉम्प्लेक्स कार्ब
स्टार्चचा समावेश असलेल्या भाज्या, सोयाबीन आणि अन्य धान्य
२. साखर
फळं, बेकरीमधील पदार्थ, शीत पेये
३. फायबर
गहू, डाळ, छोले, जांभूळ
तज्ज्ञांचं मत काय?
अमेरिकन डायबिटीज संस्थेमधील काही तज्ज्ञ लोकांना आपल्या डाएटमध्ये मांस, चिकन, पांढरे अंड, कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी पीनट बटर, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइलचा डाएटमध्ये समावेश असायला हवा असं देखील ते आवर्जून सांगतात. खरं तर मधुमेहामुळे आज बहुतांश लोक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे. यासाठी डाएटकडे आवर्जून लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
| --------------------------- | --------------------------- |